मंत्रालयातील बैठक

प्रसिद्धी पत्रक
चित्रपट, टेलिव्हिजन व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या दृष्टीने निश्चित स्वरूपाचे धोरण आखेले जाईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुबई: ४ सप्टेंबर २०१७, मंत्रालय
"चित्रपट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मिडिया या क्षेत्राची सांगड घालण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षात बरीच स्थित्यंतरे या क्षेत्रात आल्यामुळे कामाचे स्वरूप आणि वर्तमान आव्हान या मुळे संघर्ष उभा राहत आहे. 'ब्रॉडकास्टर' नावाचा घटक या क्षेत्रात नव्याने महत्वाची भूमिका पार पाडत आहे. त्याला दुर्लक्षून चालणार नाही. तो मुख्य स्तोत्र झाला असून संघर्ष मात्र कामगार आणि निर्माता वर्गा मध्ये होत आहे" असे निरीक्षण राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलेंगेकर पाटील यांनी मंत्रालयात पार पाडलेल्या एका बैठकीत व्यक्त केले.
दिनांक ३० ऑगस्ट रोजी कामगार मंत्र्यांनी विनंती केल्यावर संपावर गेलेल्या चार लाख चित्रपट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. आणि आज झालेल्या चित्रपट, टेलिव्हिजनचे निर्माते आणि कामगार वर्गाच्या प्रतिनिधी मध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. *या बैठकीला भाजपाचे मुबई अध्यक्ष, आमदार - आशिष शेलार, मा. आमदार श्री. अतुल शहा आणि मुख्य कामगार आयुक्त यशवंत केरुरे, उपायुक्त व्ही के बुवा उपस्थित होते. तसेच फिल्म सिटीच्या व्यवस्थापिका श्रीम. जयश्री भोज ह्या देखील हजर होत्या*
आशिष शेलार यांनी निर्माता आणि कामगार वर्गाच्या बाजू ऐकून घेतल्या आणि मधल्या सत्रात कामगार मंत्री आणि आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानुसार समिती स्थापून या उद्योगासाठी स्पेशल सर्टिफाएड स्टँडिंग ऑर्डर्स द्वारे कायमस्वरूपी तोडगा काढता येईल का याची चाचपणी करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी सुचविले. सरकार यावर निश्चित स्वरूपाचे धोरण आखेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आले. त्यानुसार कामगार मंत्र्यांनी दहा दिवसाची मुदत निर्माता आणि चित्रपट कामगारांच्या प्रतिनिधीला दिली असून, या कालावधीत संपूर्ण लेखाजोखा मांडण्याची सूचना केली आहे.
चार तास चाललेल्या दीर्घ बैठकीला IFTPC, IMPPA, Producer Guild, WIFPA या निर्मात्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी जे डी मजेठीया, नितीन वैद्य, अभिमन्यू सिंग, दिलीप दळवी उपस्थित होते. तर कामगारांच्या वतीने FWICE चे बी एन तिवारी, दिलीप पिठवा व अन्य पदाधिकारी आणि भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गोरक्ष धोत्रे,सरचिटणीस- विजय सरोज, सत्यवान गावडे, सौ डॉ प्रिती व्हिक्टर, कोषाध्यक्ष: श्री संजय दळवी,प्रदेश उपाध्यक्ष, अजय घाटे, संतोष बनसोडे, आशिष उबाळे, सलिम शेख, सुहास निबंधे,प्रदेश सेक्रेटरी, सौ पुनमजी घोरपडे,मुंबई उपाध्यक्ष, उल्हास नाद्रे, संदीप मिश्रा उपस्थित होते
भाजपा चित्रपट कामगार आघाडीने या संपूर्ण प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे अध्यक्ष संजय केनेकर* यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांमध्ये विश्वास निर्माण करून संपाला कोणतेही गालबोट लागू न देता विद्यमान सरकारच्या प्रती चित्रपट कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण केली. "आज झालेल्या बैठकीत सरकारने कामगारांचे म्हणणे ऐकून घेऊन कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले याबद्दल मी शतशः आभारी आहे" असे उदगार समारोपाच्यावेळी भाजपा चित्रपट आघाडीचे अध्यक्ष गोरक्ष धोत्रे यांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र भाजपा चे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशीष शेलार,* मा.आमदार तथा नगरसेवक अतुल शहा यांनी या प्रकरणात जे महत्वपूर्ण योगदान दिले त्याबद्दल देखील विशेष आभार व्यक्त केले.



Comments

Popular posts from this blog